मुझफ्फरनगरमध्ये कारखान्यांना वेळेवर गाळप सुरू करण्याचे निर्देश

मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम वेळेवर सुरू करावा आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपली तयारी पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त ऊस आयुक्त विवेक कनौजिया यांनी साखर कारखान्यांना २०२१-२२ या हंगामातील गळीत हंगामाचे सत्र वेळेवर सुरू करण्यास सांगितले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपली तयारी पूर्ण करावी. मुझफ्फरनगर, शामली आणि सहारनपूर साखर कारखान्याच्या नोडल अधिकारी कोजिमा यांनी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खतौली आणि मन्सूरपूर कारखान्याला भेट दिली. गळीत हंगाम सुरू करण्याबाबतच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाला आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळेवर गाळप हंगाम सुरू करण्याबाबत निर्देश दिले.

राज्य सरकारने ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत गाळपाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here