लवकरात लवकर थकीत ऊस बिले देण्याचे साखर कारखान्याला निर्देश

चंदीगड : फगवाडा येथील संधार साखर कारखान्याच्या मालकांना थकीत ऊस बिलापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २२ कोटी रुपये द्यावेत असे निर्देश कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी दिले आहेत. त्यांनी Bharatiya Kisan Union (Doaba) चे पदाधिकारी आणि साखर कारखाना प्रशासनाशी झालेल्या भेटीनंतर हे निर्देश जारी केले आहेत.

कारखान्याच्या व्यवस्थापनाविषयी कडक भूमिका घेताना मंत्री धालीवाल यांनी कृषी विभागाला यापूर्वीची सर्व देणी देण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे थकीत असलेल्या ७२ कोटी रुपयांपैकी २२ कोटी रुपये हरियाणातील भुना येथील कारखान्याची मालमत्ता विक्री करून लवकरात लवकर दिले गेले पाहिजेत असे ते म्हणाले. कारखान्याने सध्याच्या गळीत हंगामातील साखर साठा आणि मोलॅसीस विक्री केली आहे.

मंत्री धालीवाल यांनी कारखान्याच्या खात्यांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या प्रशासनाला उर्वरीत ५० कोटी रुपये देण्याबाबत नोटीस जारी करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here