व्याजाची रक्कम तीन महिन्यात द्यावी, अन्यथा साखर कारखान्यावर जप्ती

औरंगाबाद : ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊसाची पूर्ण रक्कम कारखान्यांनी शेतकर्‍यांना द्यावी, अन्यथा एफआरपी वर 15 टक्के व्याजदराने पैसे द्यावेत, असा नियम आहे. त्यानुसार साखर आयुक्तांकडे कारखान्यांचे प्रकरण आले आणि त्यांनी या कारखान्यांनी एफआरपी वर 15 टक्के व्याजदराने पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. ही व्याजाची रक्कम तीन महिन्यात न दिल्यास साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेशात नमुद करण्यात आलेल्या व्याजाच्या वसुलीची जबाबदारी नांदेडच्या साखर सहसंचालकाकडे सोपविण्यात आली आहे. सर्व कारखान्यांनी एफआरपीची माहिती साखर सहसंचालकाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठात आणि साखर आयुक्तांसमोर याचिकाकर्त्यांची बाजू राम राजे आणि शंभू राजे देशमुख यांनी मांडली.

या आदेशामुळे भाऊराव चव्हाण सहकारी, नांदेड (अशोक चव्हाण), पूर्णा सहकारी, वसमत नगर, हिंगोली (जयप्रकाश दांडेगावकर), रेणुका शुगर्स पाथ्री, परभणी (विद्या मुरकुंबी, बंगळुरू), योगेश्‍वरी इंडस्ट्रीज, लिंबा, पाथ्री, परभणी (आर.टी. देशमुख), गंगाखेड शुगर (रत्नाकर गुट्टे), विठ्ठलसाई, राजीव गांधीनगर, ता. उमरगा, उस्मानाबाद (बसवराज पाटील), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अरविंदनगर, उस्मानाबाद (अरविंद गोरे), नॅचरल शुगर, साई नगर, रांजणी, उस्मानाबाद (बी.व्ही. ठोंबरे), भैरवनाथ शुगर, सोनारी परंडा, उस्मानाबाद (तानाजी सावंत), भीमाशंकर, पारगाव (नितीन लोढा), लोकमंगल अ‍ॅग्रो, सुभाषनगर, उत्तर सोलापूर (सुभाष देशमुख), विलास सहकारी, उदगीर (अमित देशमुख), विलास सहकारी, निवळी, लातूर (अमित देशमुख), विकासरत्न विलासराव देशमुख, मांजरा, लातूर (वैशाली देशमुख), रेणा सहकारी, रेणापूर, लातूर (बसवराज पाटील), जागृती शुगर, देवणी, लातूर (गौरवी दिलीप देशमुख), सिद्धी शुगर, उजना, लातूर (बाबासाहेब पाटील), पन्नगेश्‍वर शुगर, पाणगाव, रेणापूर, लातूर (पंकजा मुंडे), श्री साईबाबा शुगर, गोद्री, औसा, लातूर (राजेश्‍वर बुके), शंभू महादेव, हावरगाव, कळंब (राणा जगजीतसिंह पाटील/ दिलीप नाडे) रा कारखान्यांचे धाबे दणाणले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here