उत्तर प्रदेशात डिस्टिलरीसाठी गुंतवणूकदारांची रिघ, १२५०.४४ कोटींची गुंतवणूक

लखनऊ: राज्यामध्ये साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा चेहरामोहरा बदलत आहे. खासगी क्षेत्रातील ११ साखर कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून गाळप क्षमतेचा विस्तार केला आहे. आता मोठे उद्योजक १२५०.४४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून राज्यात १६ नव्या डिस्टीलरी सुरू करीत आहेत. दालमिया ग्रुपच्या डिस्टिलरीतून उत्पादनही सुरू झाले आहे. उर्वरीत १५ डिस्टिलरी या वर्षाच्या अखेरपर्यंत उत्पादन सुरू करतील.

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी डिस्टिलरी सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे. डिस्टीलरी सुरू करणाऱ्यांमध्ये डीसीएम श्रीराम, पार्ले बिस्कीट, बलरामपूर साखर कारखाना अशांचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी सरकारच्या धोरणांना पाठिंबा देत गुंतवणूक केली आहे.

गेल्या हंगामात याच गुंतवणूकदारांनी यामध्ये कोणतीच भूमिका घेतली नव्हती. एका पाठोपाठ एक कारखाने बंद झाले. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या धोरणाने हे कारखाने सुरू केले. तसेच साखर उत्पादनात राज्याला पहिल्या क्रमांकावर आणले आहे. देशाचा विचार केल्यास राज्यात उसाचे ५१ टक्के उत्पादन होते. तर साखरेचे ३८ टक्के उत्पादन केले जाते. देशातील ५२० पैकी ११९ कारखाने राज्यात आहेत. ४८ लाख ऊस उत्पादकांपैकी २६ लाख ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस पाठवतात. या उद्योगातून साडेसहा लाख लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.
आता डिस्टिलरी युनीटसाठी १२५० कोटींची गुंतवणूक झाली आहे. यामध्ये डीसीएम श्रीराम लिमिटेडने हरदोई येथे डिस्टिलरी सुरू केली आहे. त्याचे उत्पादन सुरू आहे. त्याशिवाय, सुपीरियर बायोफ्यूल्स लिमिटेडने शामलीमध्ये, करीमगंज बायोफ्यूल्स लिमिटेडने रामपुरमध्ये, अजुधिया बायोफ्यूल्स लिमिटेडने बिलारीमध्ये, महाकौशल अॅग्रीक्राप इंडिया लिमिटेडने प्रयागराजच्या शंकरगडमध्ये, यदु शुगर मिलने बदायूंमध्ये, आरती डिस्टिलरी कानपुरने देहातमध्ये युनीट सुरू करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय इथेनॉल उत्पादनात युपी अव्वल आहे. राज्यात २०१७-१८ पासून जानेवारी २०२१ पर्यंत ५४ डिस्टिलरींनी २६१.७२ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here