ब्रह्मवर साखर कारखान्याची पुर्नउभारणी कठीण

उडपी: ब्रह्मवर साखर कारखान्याची फेरउभारणी करणे अवघड बाब आहे असे मंत्री सुनील कुमार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सध्या सरकारची आर्थिक स्थिती खराब बनली आहे. अशा स्थितीत कारखान्याची फेरउभारणी करणे अशक्य बाब आहे. भविष्यात यासंबंधी विचार केला जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे कोटा येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना मंत्री सुनील कुमार म्हणाले, केंद्र सरकारने प्रीपेड मीटर लागू करण्याच्या योजनेवर चर्चा सुरू आहे. बेंगळुरू येथील वीज पुरवठा कंपनी लिमिटेडशी (बेसकॉम) याबाबत आधीही चर्चा झाली आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. योजनेचे फायदे-तोटे जाणून घेतल्यानंतर आगामी काळात हे मीटर लागू करायचे की नाहीत याविषयाचा निर्णय घेण्यात येणार आहे
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here