मजूर आपल्या घरी परत गेल्याने गुळ उत्पादनावर परिणाम

मंड्या : COVID-19 मुळे लॉकडाउन लागू केल्यानंतर मंडया जिल्ह्यात गुळ उत्पादन जवळपास 30 टक्यांपर्यंत कमी झाले आहे. कुशल मजूर आपापल्या घरी परत गेल्यामुळे गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळांनी आपले उत्पादन बंद केले आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर 539 नोंदणीकृत गुळ बनवणाऱ्या गुऱ्हाळांमध्ये मध्ये जवळपास 30 टक्के उत्पादन पूर्णपणे बंद झाले आहे. बहुसंख्य कुशल मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य पूर्वोत्तर राज्य आणि उत्तर कर्नाटक येथील होते. पांडवपुरा येथील
चिक्कमाराली जवळ एका गुळ गुऱ्हाळांच्या मालकाने सांगितले की, यापैकी अनेक जण आपल्या गावी परत गेले आहेत.

मांड्या कृषि उत्पादन बाजार समिति (एपीएमसी) चे सचिव वाई. नानजुंदस्वामी यांनी सांगितले की, 2019 मध्ये 25 मार्च ते 10 मे या काळात गुळाची आवक 83,000 क्विंटल इतकी राहिली. या वर्षी याच काळात उत्पादन कमी झाल्यानंतर ही आवक 58,000 क्विंटल इतकी राहिली आहे. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या दिवसात स्थिती सामान्य होईल.

गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापारी मंडया गुळाचे प्रमुख खरेदीदार आहेत. बहुसंख्य कुशल मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य पूर्वोत्तर राज्य आणि उत्तर कर्नाटक येथील होते. गुऱ्हाळ्याच्या मालकाने सांगितले की, आम्ही ऊसाची सफाई, तोडणी आणि लागवड व उत्पादन वाढवण्यासारख्या कामांसाठी स्थानिक लोकांना कामावर ठेवू शकतो. पण ऊसाचा रस उकळणे आणि गुळाला आकार देण्यासाठी अकुशल श्रमिकांना कामावर ठेवू शकत नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here