साखर कारखान्यांच्या बिकट परिस्थितीवर जेडी(एस) ने व्यक्त केली चिंता

मंड्या : मायसुगर आणि पीएसएसके साखर कारखान्यांच्या बिकट परिस्थितीवर चिंता व्यक्त करुन जनता दलाच्या आमदारांनी राज्य सरकारकडून इतर कारखान्यांवर ऊस गाळप करण्याचा आग्रह केला. गाळप संकटामुळे अडचणीत असणार्‍या ऊस शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी जेडीएस यांच्याकडून करण्यात आली.

जडीएस नेत्यांनी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली आणि त्यानंतर डेप्युटी कमिशनर एम.वी. वेंकटेश यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे एक निवेदन दिले. त्यांनंतर त्यांनी सांगितले की, राज्य सरकार ची मालकी असणाऱ्या मैसूर शुगर कंपनी लिमिटेड (मायसुगर) आणि पांडवपूर मध्ये पांडवपुरा सहकारी सकरे कारखाना (पीएसएसके) कार्य सुरु होण्याच्या मुद्यांमुळे अनेक गाळप हंगामापासून बंद आहे. पूर्व मुख्यमंत्री एच,डी., कुमारस्वामी यांनी 100 करोड खर्चून मायसुगर परिसरामध्ये नवा कारखाना सुरु करण्याची योजना बनवली होती. तरीही, भाजप सरकारने कारखान्याच्या खाजगीकरणाची योजना बनवली. त्यांनी सांगितले की, पक्ष नवा कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीने सरकारचे लक्ष केंद्रीत करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here