कर्नाल साखर कारखाना २०२१-२२ मध्ये वेळेत सुरू होणार: एमडी आदिती

कर्नाल : कर्नाल सहकारी साखर कारखान्याबाबत सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जात आहे. कारखाना बंद करण्याच येणार असल्याची अफवा आहे. मात्र, वस्तूस्थिती अशी नसल्याचे कारखान्याच्या कार्यकारी संचालक आदिती यांनी सांगितले.

आदिती म्हणाले, गळीत हंगाम २०२०-२१ मधील अंतिम टप्प्यात हरियाणा प्रदूषण नियंत्रण बोर्डाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पथकासह ८ फेब्रुवारी २०२१ मध्ये साखर कारखान्यांची पाहणी केली होती. त्यावेळी जल प्रदूषणाबाबत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या सर्व कारखान्याने दूर केल्या आहेत.कारखान्याच्या जुन्या प्लांटमधील प्रदूषणाशी संबंधीत फ्लोमीटर, टोटलायझर हे अद्यायावत नव्हते. त्यांची दुरुस्ती केली गेली आहे. आगामी २०२१-२२ या गळीत हंगामात नवनिर्मिती विस्तारीकरण केलेला रिफाईंड शुगर प्लांट वेळेवर सुरू राहील. त्याबद्दल कोणी गोंधळून जाऊ नये असे आदिती यांनी सांगितले. गेल्या हंगामात कारखाना १० नोव्हेंबर रोजी सुरू होऊन १२ एप्रिल २०२१ पर्यंत सुरू राहीला होता. जुन्या प्लांटमधून २८.५४८ क्विंटल उसाचे गाळप करून २६९९७४ क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले होते. ८ एप्रिल रोजी सुवर्णजयंती कार्यक्रमाअंतर्गत नवीन कारखान्याची विधीवत चाचणी घेण्यात आली. रिफाईंड शुगरच्या नव्या प्लांटची क्षमता ३५०० टीसीडी आहे. प्रदूषणाचे सर्व मानक पाळले गेले असून विस्तारीकरण केलेल्या प्लांटमधून १०.३० लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ९४,४६० क्विंटल रिफाइंड साखरेचे उत्पादन करण्यात आल्याचे आदिती यांनी सांगितले. ३१ मे २०२१ रोजी हरियाणा स्टेट पोपुलेशन बोर्डाची क्लोजर ऑर्डर पाठवली गेली होती. त्याआधी १२ एप्रिल २०२१ मध्ये कर्नाल को-ऑपरेटिव्ह शुगरचा जुना प्लांट बंद करण्यात आला असून तो सरप्लस घोषीत करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here