कर्नाटक: ऊस दरवाढ अपुरी असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; आंदोलनाचा इशारा

बेंगळुरू : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एफआरपी वाढविण्याची मागणी केली आहे. याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

बेंगळुरू येथे याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना कर्नाटक राज्य ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कुरबूर शांताकुमार यांनी एफआरपीमध्ये फक्त ५० रुपये प्रती टन वाढविण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे सांगितले. तीन वर्षांनंतर इतक्या कमी वाढीबाबत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, जर सरकार योग्य निर्णय घेण्यास अपयशी ठरले तर राज्यातील २५ लाख शेतकरी बेंगळुरू येथे विधान भवनासमोर आंदोलन करतील. सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याची मुदत त्यांनी दिली. ते म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळत आहे. आणि साखर कारखान्यांकडून ऊस बिले उशिरा मिळत आहेत. आपला दर ठरविण्याबाबत त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. सरकारने इथेनॉल निर्मिती करुन मिळणारा नफा शेतकऱ्यांना देण्याबाबत काहीच कार्यवाही केलेली नाही. सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकमध्ये संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर रोजी बंदचे आवाहन केले आहे. त्याला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here