कर्नाटक: कलबुर्गी मध्ये मोठ्या पवासामुळे ऊस आणि इतर पीकांचे झाले नुकसान

कलबुर्गी, कर्नाटक: जिल्ह्यामध्ये ऊसाचे मोठ्या पवसामुळे नुकसान झाले आहे, ज्यामुळे उत्पादकांना गंभीर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. या परिसरात पाउस आणि पुरामुळे बहुसंख्य पीके पाण्यात बुडाली आहेत.

कर्नाटक रेड ग्राम ग्रोअर्स असोसिएशन (केआरजीजीए) चे अध्यक्ष बासवराज इंगिन यांच्या अंदाजानुसार, उभ्या पिकांचे 500 करोड रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभाग नुकसान झालेल्या पीक क्षेत्राचे सर्वेक्षण करत आहे.

इंगिन यांनी सांगितले की, कृषी विभागाने अजूनही आपले सर्वेक्षण पुर्ण केले नाही. आमच्या अंदाजानुसार, सर्व कृषी पीकांचे जवळपास 500 करोड रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असावे. जिल्ह्यामध्ये लाल चणा, काला चणा, कापूस, संकरित ज्वारी, बाजरी, मक्का, ऊस, भुईमुग आणि हरभरा सारख्या पीकांची लागवड 7.55 लाख हेक्टर मध्ये पूर्ण झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here