मड्या, कर्नाटक: जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी आयुष्य रेषा समजल्या जाणारा म्हैसूर साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याबाबत कोणतेही संकेत मिळत नाहीत. ज्यामुळे मांड्या येथील शेंतकरी आपला ऊस तामिळनाडू च्या साखर कारखान्यांना पाठवित आहेत.ऊसाने भरलेले ट्रक रस्त्यांवरुन धावणे हे जिल्ह्यासाठी आता सामान्य झाले आहे. तामिळनाडूतील कारखान्यांकडून नियुक्त एजंट शेतकर्यांना आपले उत्पादन विकण्यासाठी त्यांची समजूत काढत आहेत. जिथे काही खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे, तिथे काही सहकारी कारखाने गाळप सुरु करण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यामद्ये गाळपासाठी जवळपास 50 लाख टन ऊस उपलब्ध आहे. त्यामध्ये जवळपास 30 लाख टन पीकासाठी तयार आहे. केआर च्या कोरोमंडल साखर कारखाना आणि मद्दुर मध्ये एनएसएल आणि चामुंडेश्वरी कारखान्यामध्ये यापूर्वीच हंगाम सुरु झाला आहे. पांडवपुरा सहकारी साखर कारखान्याला निरानी शुगर्स ला भाडेपट्टीवर देण्यात आले आहे. आणि 11 ऑगस्टपर्यंत गाळप पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन आणि वयवस्थापक प्रणाली अंतर्गत, मायशुगर कारखाना पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु आहे. पण पंड्या, पांडवपुरा आणि श्रीरंगपट्टन तालुक्यांमद्ये पीकलेला ऊस तामिळनाडूच्या शक्ती शुगर आणि प्यारी साखर कारखान्यामध्ये चालला आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षी अन्य जिल्हे आणि राज्यांमध्ये ऊसाच्या वाहतुकीची व्यवस्था केली होती, कारण विविध कारणांमुळे मांड्या जिल्ह्यातील साखर कारखाने बंद होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.