कर्नाटक: गाळप क्षमतेमध्ये वाढ होण्याबरोबरच, पांडवपुरा साखर कारखान्यात गाळप सुरु

मांड्या, कर्नाटक: पाच वर्षांपासून बंद असलेल्या , पांडवपुरा साखर कारखान्यामध्ये आज गाळप सुरु होईल, ज्यामुळे या भागातील हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. कारखाना अनेक वर्षांपासून वाढत्या नुकसानीमुळे बंद होता. राज्य सरकारने कारखाना चालवण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यानंतर बागलकोट येथील निरानी शुगर्स ने 40 वर्षांच्या भाडेपट्टीवर कारखाना चालवण्यासाठी टेंडर मिळवले.

टेंडर मिळवल्यानंतर, निरानी शुगर्स ने कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक तयारी केली. ज्याचे औपचारिक उद्घाटन 11 ऑगस्ट 2020 ला करण्यात आले होते. आमदार मुरुगेश निरानी यांनी कारखान्याला भाडेपट्टीवर घेतल्यानंतर क्रशिंग क्षमतेला 3,500 टन प्रति दिवस पासून 5,000 टन प्रति दिवस पर्यंत वाढवण्याची योजना बवनली आणि याबाबतच्या यांत्रिक कार्याची गती वाढवली. आता, सर्व आवश्यक तयारीसह, एक दशक जुना कारखाना आजपासून ऊस गाळप सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्यातही आनंदाची लहर आहे. कारखाना व्यवस्थापनाने आश्‍वासन दिले की, ते ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना 15 दिवसांच्या आत एफआरपी नुसार पैसे देणार आणि सर्व कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार दिला जाणार.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here