नैरोबी : किसुमूमधील दोन प्रमुख साखर कारखान्यांचे क्रशिंग बंद पडल्याने न्यांडो साखर पट्ट्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बंद कारखान्यांमुळे ऊसाचे ट्रक रिकामे होण्यासाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर केनिया कंपनीच्या मालकीच्या मिवानी कारखान्यामध्ये वेस्टब्रिजचे काही ट्रक चालक पाच दिवसांपासून थांबून आहेत.
किबोस शुगर कंपनीतही ब्रेकडाउन मुळे गाळप थांबले आहे. स्थानिक शेतकरी डॅनियल ओविच यांनी सांगितले की, जेव्हापासून किबोस शुगर कंपनीचे कामकाज थांबले आहे, तेव्हापासून आम्ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलो आहोत. आम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, किबोस शुगर हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्ट व्यवस्थापकांनी पत्र लिहून सांगितले आहे की, कारखान्यात टर्बाईनशी संबंधीत एक तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. पुढील सुचना मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या उसाची वाहतूक करू नये. वेटब्रिजच्या कार्यस्थळावर असलेले, उसाने भरलेले ट्रॅक्टरही जवळच्या इतर साखर कारखान्यांकडे गाळपासाठी न्यावेत असे आवाहनही त्यांनी पत्रामधून केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link