कोल्हापूर : यावर्षी जुलै महिन्यात आलेल्या ऊस पिकाबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बोलावली आहे. जिल्ह्यात पुरामुळे ६०,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. उसाचे ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास ते गृहीत धरले जाते. सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशा नुकसानग्रस्त पिकामुळे साखरेचा उतारा कमी मिळतो. त्यामुळे साखर कारखाने असा ऊस घेण्यास टाळाटाळ करतात. जिल्ह्यातील काही कारखान्यांनी मात्र, अशा उसाचा प्राधान्याने वापर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर काही पैसे मिळतील.
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासोबत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हा प्रश्न मांडला होता. खासदार माने यांनी सांगितले की, कारखाने नेहमी अशा प्रकारचा ऊस घेण्यास टाळाटाळ करतात. कारण, त्यांच्या एकूण साखर उताऱ्यावर परिणाम होतो. यासोबतच ऊस तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून ऊस तोडून तो कारखान्यांना पोहोचविण्यासाठी जादा पैशांची मागणी करतात. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रश्न मांडला आहे. ते कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यास तयार आहेत. नुकसान झालेल्या उसाच्या तोडणीसाठी खास मोहीम राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link