कोल्हापूर विभागात आतापर्यंत 252.76 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पुणे : महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साखर कारखाने यंदाच्या गळीत हंगामात सहभागी झाले. त्यामुळे साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यात ८६५.६२ लाख टन उसाचे गाळप झाले असून ८९४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३३ टक्के आहे.
कोल्हापूर विभागात या हंगामात सर्वाधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागात २१२.४३ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून २५२.७६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. विभागाचा सरासरी साखर उतारा १२ टक्क्यांपर्यंत आहे. सध्या साखर उतारा ११.९० टक्के आहे.

सद्यस्थितीत कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखाने सुरू आहेत. दोन कारखाने बंद झाले आहेत. सर्वाधिक कारखाने सोलापूर विभागात ७ मार्चपर्यंत सुरू होते. आता ४१ कारखान्यांपेक्षी २५ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here