एका आठवड्यात देणी भागवावीत: साखर कारखान्यांना नोटीस

कुशीनगर(उत्तरप्रदेश) : शेतकर्‍यांची प्रलंबित देयकांच्या बाबतीत ऊस विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. एका आठवड्यात जर कारखान्यांनी शेतकर्‍यांची देणी भागवली नाहीत, तर त्यांना पुढच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी नोटीस ऊस विभागाने कारखान्यांना दिली आहे. सध्याच्या गाळप सत्रामध्ये जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांची प्रलंबित देणी 477 करोड 91 लाख इतकी ओत. कारखान्यांनी केवळ 262 करोड 39 लाख रुपये भागवले आहेत. अजूनही 215 करोड 51 लाख रुपये प्रलंबित आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये डीएम डॉ. अनिल कुर सिंह यांनी डीसीओ यांना थकबाकी लवकरात लवकर भागवावीत असे आदेश दिले होते, यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

ऊस विभागाच्या कडक भूमिकेमुळे कप्तानगंज साखर कारखान्याने सध्याच्या गाळप सत्राची देणी भागवणे सुरु केले आहे. यापूर्वी कारखान्याने साखर विकून गेल्या सत्रातील 31 करोड भागवले होते. या सत्रात कारखान्याने जवळपास 27 लाख क्विंटल पेक्षाही अधिक ऊस गाळप केले आहे. ज्यापैकी 65.81 लाख रुपये बाकी आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here