ऊसाअभावी कुशीनगरचा ढाढा साखर कारखाना बंद

कुशीनगर: उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथील सर्वात अग्रेसर ढाढा साखर कारखाना ऊस उपलब्ध नसल्याने पूर्णपणे बंद करावा लागला आहे. या कारखान्याने आतापर्यंत ६२.०८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. यापूर्वी कप्तानगंज साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देण्याआधीच गाळप बंद केले आहे.

ढाढा साखर कारखान्याने मंगळवारी गाळप बंद केले. जो ऊस शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये शिल्लक आहे, तो बियाण्यांसाठी ठेवण्यात आल्याचा दावा कारखान्याच्यावतीने करण्यात आला. सध्याच्या गळीत हंगामात ढाढा साखर कारखान्याने ५० हजार क्विंटल उसाची खरेदी केली होती. त्यातुलनेत ६२.०८ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले. साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत एक अब्ज वीस कोटी ६६ लाख ४४ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ५७ कोटी ९५ लाख रुपये प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here