पुढील वर्षीच्या गाळप हंगामासाठी साठियांव साखर कारखण्यामध्ये दुरुस्थीची सुरु

अमिलो: साखर कारखाना साठियांव च्या प्रशासनिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास मजबूत आहे. आतापासूनच गाळप हंगाम 2020-21 ची तयारी सुरु झाली आहे. साखर कारखान्याचे पार्टस आणि नट बोल्ट ठिक ठाक केले जात आहेत. दुरुस्तीसाठी साखर कारखान्यात मजूर नेमण्यात आले आहेत. कारखाना सातत्याने आपल्या गाळप हंगामा साठी सज्ज होत आहे.

कारखान्यात आधुनिक मशीनरीचे जाळे पसरले आहे. कारखान्याने आपल्या साखर उत्पादनासह वीज व इथेनॉलच्या क्षेत्रात सर्व लाभ मिळवले आहेत. यामुळे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढले आहे. आता आगामी गाळप हंगामाचा आरंभ होण्यामध्ये अनेक महिन्यांचा काळ आहे. तरीही आता पासूनच तयारी सुरु आहे. मशीन आणि त्याचे सर्व छोटे मोठे पार्टसची देखभाल एक्सपर्ट कडून केली जात आहे. याशिवाय साखर कारखाना परिक्षेत्रामध्ये ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी विशेषज्ञांकडून सल्ला आणि ऊस उत्पादनामध्ये वाढ करण्याचे उपाय सांगितले जात आहेत, जेणेकरुन ऊसाची कमी होऊ नये आणि पूर्ण क्षमतेने गाळप कार्य सुरु राहील. यासाठी साखर कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त आहेत. महाव्यवस्थापक प्रताप नारायण यांनी सांगितले की, साखर कारखाना यावेळी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक ऊस गाळप करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here