ऊस मंत्र्यांना सरकारच्या अश्‍वासनाची आठवण करुन देवू: राकेश टिकैत

बिजनौर, उत्तर प्रदेश : भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी संभलला जाताना जिल्हातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. शनिवारी नजीबाबाद साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या वाढीसाठी होणार्‍या आंदोलनावर दिशा निर्देश दिले.

रशीदपुर गढी गावात राकेश टिकैत यांनी पदाधिकार्‍यांना सांगितले की, याबाबत शासनाशी चर्चा केली जात आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यामुळे शेतकर्‍यांचे भले होईल. त्यांनी सांगितले की, जर शासन आणि जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या या समस्येचे निराकरण केले नाही तर संघर्ष होईल. शामली आणि मुजफ्फरनगर येथील शेतकरीही ऊस मंत्री सुरेश राणा याच्या घरात बसून प्रदेश सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करुन देण्याचे काम करतील. युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंह यांनी सांगितले की, शनिवारी नजीबाबाद साखर कारखान्यावर शेतकरी एकत्र येतील आणि 14 दिवसांच्यात आत ऊस थकबाकी आणि कारखान्याच्या गाळप क्षमतेबाबत चर्चा करतील. जर सरकारपर्यंत आवाज गेला नाही तर शेतकरी ऊस मंत्र्यांच्या घरी जातील. दरम्यान लखनउ मंडल अध्यक्ष हरिनाम सिंह वर्मा, अतुल कुमार आदी शेतकरी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here