साखर कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

बुलंदशहर : दि किसान सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ करावी या मागणीसाठी अनुपशहरचे आमदार संजय शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यास त्याचा फायदा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल असे आमदारांनी पत्रात लिहिले आहे. आगामी काही दिवसात कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीचा आदेश जारी केला जाईल अशी अपेक्षा शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

अनुपशहर येथील किसान सहकारी साखर कारखान्याशी पाच विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी जोडले गेले आहेत. ४५ वर्षांपूर्वी साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून कार्यक्षेत्रात ऊसाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आमदार संजय शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि किसान सहकारी साखर कारखाना पाच विधानसभा मतदारसंघाशी संलग्न आहे. जवळपास ४५ वर्षे जुना असल्याने कारखान्याची स्थिती अत्यंच खराब आहे. निवडणुकीवेळी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सातत्याने मागणी करुनही अद्याप यात वाढ करण्यात आलेली नाही. कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची आंदोलने संपुष्टात येतील. कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीचा आदेश जारी करावा अशी मागणी आमदार शर्मा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here