लोकनेते देसाई कारखान्याकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऊस तोडणी, वाहतूक करार

सातारा : आजपर्यंत साखर कारखान्यांचे ऊसतोडणी वाहतूक करार हे साधारण मे महिन्यात केले जातात. मात्र, पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २०२४-२५ या वर्षासाठी ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ गुढीपाडव्याला करण्यात आला. कारखान्याने या कराराचा प्रारंभ करून एक पाऊल पुढे टाकले आहे.

लोकनेते देसाई कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे म्हणाले की, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चेअरमन यशराज देसाई यांच्या प्रयत्नातून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची प्रगती कायम राखण्यात यश मिळविले आहे. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून उसाचे अधिक उत्पादन घ्यावे. ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास द्यावा. यावेळी शिवाजीराव देसाई ऊसतोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव, शेती अधिकारी वैभव नलवडे, संस्थेचे सचिव नवनाथ साळुंखे, केन यार्ड सुपरवायझर मानसिंग मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here