शेतकर्‍यांसमोर ऊस तोडणीसाठी मजुरांच्या तुटवडा

शामली, उत्तर प्रदेश: शेतकर्‍यांच्या समोर समस्या कायमच्याच आ वासून उभ्या आहेत. साखर कारखाने सुरु असू देत, अथवा नसू देत, पण ऊसतोडणीचे काम सुरु झाले आहे. मजुरांची खूपच कमी आहे. ते मिळत जरी असले तरी अधिक अ‍ॅडव्हान्स मागत आहेत.

जिल्ह्यामध्ये बहुसंख्य शेतकर्‍यांजवळ ठेके किंवा नोकरीवर बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल मधून मजूर येतात. लॉकडाउन लागू झाल्यावर मजूर आपल्या घराकडे परत गेले होते. शेतकरी ठेकेदारांशी संपर्क करत आहेत, पण अजूनही स्थिती ही आहे की, अधिक मजूर यायला तयार नाहीत. आणि जे तयार आहेत, त्यांना मजुरी आणि ठेक्याच्या दरात वाढ करुन दिली आहे. गेल्या वर्षी 40 रुपये प्रति क्विंटल दराने मजुर ऊसाची तोडणी करत होते आणि आता 45 ते 50 रुपये मागत आहेत. शेतकर्‍यांचा नाइलाज आहे, पण कुणाला चार मजुरांची गरज आहे, तर त्यांना एक किंवा दोनच मिळत आहेत. अशामध्ये शेतकर्‍यांच्या कपाळावर चिंता आहे. कोरोना च्या प्रकोपामुळे आता खूपच कमी रेल्वे ची वाहतूक होत आहे. अशामध्ये मजूर आले तर त्यांच्या येण्याचा खर्च वाढेल, कारण ट्रेनच्या तुलनेत खाजगी वाहनाचे भाडे अधिक आहे.

पहिल्यांदा ऊसाच्या हंगामामध्ये मजूर कमी पैसे घेत होते. हंगाम संपल्यावर हिशेब होत होता. पण आता प्रति मजूर 20 हजार रुपयार्पंत अ‍ॅडव्हान्स मागितले जात आहेत. दहा हजार रुपये केवळ येण्या जाण्याचा खर्च सांगितला जात आहे आणि काही उर्वरीत ठेकेदार यांचे कमीशन.

बुटराडा येथील एक मजूर दानिश यांच्या येण्याचा खर्च आणि ठेकेदारचे कमीशन असे एकूण 18 ते 24 हजार रुपयांपर्यंत मागतिले जात आहेत. ठेक्यावर तोडणी करतील तेव्हा 50 रुपये क्विंटल आणि पगारावर ठेवतील तर सात ते आठ हजार रुपये महिना द्यावे लागतील. मजुरांसाठी रेशन आदीचा खर्चही शेतकर्‍यांना करावा लागतो.

अनिल मलिक, राष्ट्रीय महासचिव, भाकियू भानू यांच्या मते ऊस उत्पादनाचे मूल्य तर पहिल्यांदाच खूप वाढले आहे. आता ऊस तोडणीचा खर्चही खूप वाढला जाईल. शेतकर्‍यांना मजूर मिळण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत. सरकारकडून ऊस मूल्यामध्ये सर्व बाबी लक्षात घेता वाढ केली जावी. खूपच कमी स्थानिक मजूर ऊस तोडणीचे काम करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here