ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकी बाबत अखिलेश यांच्या प्रश्नावर ऊस मंत्र्यांचे उत्तर

लखनऊ : उत्तर प्रदेशात सामान्य जनता एकीकडे लॉकडाउन शी सामना करत रोजच्या गरजांना पूर्ण करण्याबरोबरच कोरोना पासून वाचण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत आहे. तर,राजकीय दलांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्वीट करुन ऊस शेतकऱ्यांच्या समस्यांना समोर आणले आहे. त्यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांना थकबाकी मिळालेली नाही आणि साखर कारखाने आता आठवड्याभरात ऊस तोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. अखिलेश यांच्या या ट्वीट वर योगी सरकार मध्ये ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ट्वीट केले. ते म्हणाले, योगी सरकारने 38 महीन्यात ऊस शेतकऱ्यांची आतापर्यंत 98,382 करोड़ इतकी बाकी भागवली आहे. आधीच्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा हे अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला.

अखिलेश यादव यांनी ट्वीट केले की, पश्चिमी उत्‍तर प्रदेशातून सातत्याने साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांची देणी देय असल्याच्या बातम्या येत आहेत. आता कारखाने शेतकऱ्यांवर एका आठवड्यात ऊस तोड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. जे कोरोना संकटकाळात शक्य नाही. उत्तर प्रदेशात सरकार आहे का?

अखिलेश यांच्या ट्वीट वर ऊस मंत्री सुरेश राणा यांनी उत्तर दिले की, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या आदेशावर 38 महिन्यात ऊस शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षाच्या देयासह आतापर्यंत 98,382 करोड़ रुपये भागवले आहेत. हे गेल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा अधिक आहे. सध्याच्या हंगामाची आतापर्यंत 19,328 करोड़ इतके शेतकऱ्यांचे पैसे भागवले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here