महाराष्ट्र : १५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाई

पुणे : राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयाने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, राज्यात जर एखाद्या कारखान्याने १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू केले तर संबंधीत कारखान्याच्या कार्यकारी संचालकाविरोधात गुन्हा दाखल केल जाईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व कारखान्यांना अध्यादेश जारी करण्यात आली आहे. या अध्यादेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण आदेश, १९६६ अनुसार, साखर कारखाने गाळप परवान्याविना उसाचे गाळप करून शकत नाहीत. दरवर्षी राज्य सरकारच्या मंत्री समितीने ठरवलेल्या तारखेपूर्वी उसाचे गाळप सुरू केले जाऊ शकत नाही. यासोबतच दरवर्षी कारखान्यांना गाळप करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाला अर्ज करावा लागतो. गाळप परवाना मिळाल्यानंतर कारखाने गाळप सुरू करू शकतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here