मुंबई : महाराष्ट्र सरकारने झालेल्या बैठकीत राज्यात अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १०,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत एक ट्विट केले आहे. जून ते ऑक्टोबर या काळात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाने या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना १०,००० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा केली आहे.
शेतीसाठी १०,००० रुपये प्रती हेक्टर, बागायतीसाठी १५,००० रुपये प्रती हेक्टर आणि बारमाही पिकांसाठी २५,००० रुपये प्रती हेक्टर मदत देण्याची घोषणा करण्यात आली. दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला ही मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीत याची घोषणा केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link