लखीमपूर हिंसाचाराविरोधात महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तारुढ महाविकास आघाडीच्या सहयोगी घटक असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराविरोधात आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. लोकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष बंदमध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांना भेटून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतील. शेतकऱ्यांसाठी एकजूट कायम राहील. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तीन कृषी कायदे बनवून शेतकऱ्यांच्या लुटीला प्रोत्साहन दिले आहे. आता त्यांच्या मंत्र्यांचे नातेवाईक शेतकऱ्यांची हत्या करीत आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, कार्यकर्ते विधानभवनासमोर निदर्शने करतील. लोकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या बंदच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने यादृष्टीने तयारी केली असल्याचे सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here