महाराष्ट्र: राज्यातील 139 साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु

पुणे, महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये हंगाम 2020-21 मध्ये एकूण 139 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे, आणि आतापर्यंत जवळपास 115.2 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे आणि आतापर्यंत 95.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

साखर आयुक्त कार्यालयाच्या आकड्यांनुसार सर्वात अधिक 31 कारखाने कोेल्हापूर विभागामध्ये सुरु झाले आहेत.

139 कारखान्यांपैकी कोल्हापूर डिवीजनमध्ये 31, सोलापूर मध्ये 27, पुण्यामध्ये 24, अहमदनगर मध्ये 24, औरंगाबाद मध्ये 19, नांदेड मध्ये 12 आणि अमरावतीमध्ये 2 कारखाने सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here