महाराष्ट्रात आजअखेर ८९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

पुणे : महाराष्ट्र यंदा मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला आहे. याबाबत साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्चअखेर १८७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. राज्यात ८६५.६२ लाख टन उसाचे गाळप करून ८९४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३३ टक्के आहे.

आतापर्यंत कोल्हापूर विभागात ३५ साखर कारखाने सुरू आहेत. तर दोन साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात ७ मार्च अखेरपर्यंत सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यापैकी २५ कारखाने आता बंद झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here