महाराष्ट्र: ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी सरकार २० वसतिगृहे उभारणार

औरंगाबाद : राज्य सरकारने संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. या योजनेंअंतर्गत ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी निवडक १० तालुक्यांमध्ये एकूण २० वसतिगृहे उभारली जाणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गोपिनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाने निवडलेल्या दहा तालुक्यांमध्ये मुले आणि मुलींसाठी प्रत्येकी १०० क्षमतेची विस वसतिगृहे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

दोन जून रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत योजनेला मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजनेच्या दिशेने पाऊल उचलल्याने मी आनंदी झालो आहे. या विस वसतिगृहांपैकी १२ वसतिगृहे बिड जिल्ह्यात असतील. पाटोदा, केज, बिड, गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यात प्रत्येकी दोन वसतिगृहे सुरू होतील. याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि जामखेड तालुक्यात दोन-दोन वसतिगृहांना मंजुरी दिली जाईल.

मंत्र्यांनी ट्विट केली आहे की, पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here