महाराष्ट्रात आतापर्यंत झाले 1.65 लाख टन साखर उत्पादन

देशभऱामध्ये साखर कारखान्यांनी उस गाळप हंगाम सुरु करण्यात आला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव साखर फॅक्ट्ररीज लिमिटेड च्या नुसार, यावर्षी 5 नोव्हेंबर पर्यंत देशभरामध्ये 149 साखर कारखान्यांकडून 54.61 मिलियन टन उसाचे गाळप करण्यात आले आहे आणि 4.25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

महाराष्ट्रामध्ये 61 कारखान्यांनी सरासरी 7 टक्के साखरेच्या रिकवरी ने 23.57 लाख टन उसाचे गाळप करुन 1.65 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. इथेनॉल साठी साखरेची डायवर्सन चे अनुमानित प्रमाण लक्षात घेवून, हंगामाच्या शेवटी, महाराष्ट्रातील साखर उत्पादन 95 लाख टन होण्याची आशा आहे, जे गेल्या वर्षाच्या 61.71 लाख टनापेक्षा 33.30 लाख टन अधिक आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here