महाराष्ट्र : साखर उद्योगामुळे विजेचा तुटवडा भरून काढण्यास मदत

पुणे : जेव्हा राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे उन्हाळ्याच्या हंगामात विजेच्या टंचाईचा सामना करावा लागत होता, तेव्हा साखर उद्योग राज्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आपल्या सहवीज निर्मिती प्रकल्पांतून ६७५.५७ कोटी युनिट विजेचे उत्पादन केले. विज विक्रीतून कारखान्यांनी २,४२८ कोटी रुपये मिळवले आहेत.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, साखर उद्योगाने २०२१-२२ य़ा गळीत हंगामात ६७५.५७ कोटी युनिट विजेच उत्पादन केले. यापैकी ३८४.३० कोटी युनिट विजेची विक्री केली. तर उर्वरीत २१२.९९ कोटी युनिट वीज स्वतः कारखान्यांनी वापरली आहे. कारखान्यांनी स्वतः उत्पन्न केलेल्या विजेचा स्वतःसाठीच वापर केला. शिवाय, राज्यावरील विजेचा भार कमी करण्यासाठी मदत मिळाली.

महाराष्ट्रात ऐतिहासिक रुपात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा हंगाम २०२१-२२ ची मंगळवारी समाप्ती झाली.यासोबतच एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामातही उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी १३७.२७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्यातील साखर उद्योगाच्या स्थापनेपासून प्रथमच प्रचंड उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here