महाराष्ट्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने सुरू

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गतीने सुरू आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने कार्यरत आहेत. हंगाम २०२०-२१ मध्ये १९० कारखाने सुरू होते. आता १९४ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये २३ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९६ सहकारी आणि ९८ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६५९.०६ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ६५७.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. येथे २३ जानेवारी २०२२ अखेर १५६.५९ लाख टन उसाचे गाळप करून १४०.८३ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १५७.६१ लाख टन उसाचे गाळप करून १७८.९४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.३५ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here