महाराष्ट्र : शाहू साखर कारखाना एकरकमी एफआरपी देणार

कोल्हापूर : कागल स्थित छत्रपती शाहू साखर कारखान्याने शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात उसाला केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी या निर्णयाची घोषणा केली.

अध्यक्ष घाटगे म्हणाले, पुरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि शेतकऱ्यांचे कर्जही माफ झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस दर देण्याचा आपला नावलौकिक कायम ठेवताना आम्ही एफआरपीप्रमाणे ऊस बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे शेतकऱ्यांना एकरकमी दिले जातील असे घाटगे यांनी सांगितले.

अशा प्रकारे चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करण्यारा हा राज्यातील पहिलाच साखर कारखाना ठरला आहे.
शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या उसाची एफआरपी तीन हप्त्यांत विभागून देण्याच्या निर्णयाविरोधात मोहीम सुरू केली होती. मात्र केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर नसल्याचे स्पष्ट केले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here