महाराष्ट्र: अहमदनगर विभागात आतापर्यंत १५९.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन

पुणे : राज्यातील २०२०-२१ चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर इतर विभागातील कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात आतापर्यंत १६ एप्रिल २०२१ पर्यंत १४४ कारखाने बंद झाले आहेत.

अहमदनगर विभागात १६ एप्रिल २०२१ अखेरपर्यंत १६३.४६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर १५९.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या हंगामात विभागातील २६ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. आतापर्यंत १३ कारखाने बंद झाले आहेत. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.७९ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिलअखेर राज्यातील १९० कारखान्यांनी गाळप केले. राज्यात एकूण ९९५.८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४३.४७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्क्यांवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here