साखरेचा हंगाम तोंडावर, अजूनही कारखान्यांकडून 397 करोड एफआरपी बाकी

पुणे : 2019-20 चा गळीत हंगाम अगदी तोंडावर येवून पोचला आहे. अजूनही महाराष्ट्रातील तब्बल 56 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील 397.96 करोड रुपयाची शेतकर्‍यांची थकबाकी भागवलेली नाही. महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या नव्या आकड्यांनुसार, गेल्या हंगामाची एफआरपी जवळपास 1.71 टक्के बाकी आहे. हंगामाच्या दरम्यान, 195 कारखान्यांनी 107 लाख टन साखर उत्पादन करण्यासाठी 952.11 लाख टन ऊसाची लागवड केली.

ऊस शेतकर्‍यांचे एकूण 23,293.82 करोड रुपये कारखान्यांकडे देय होते, ज्यामधून कारखान्यांनी आतापर्यंत 22,915.62 करोड रुपये (98.38 टक्के) दिलेले आहेत. जवळपास 56 कारखान्यांकडून अजूनही एफआरपी देणे बाकी आहे आणि 139 कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी भागवली आहे, यापैकी 45 कारखान्यांनी 80-99 टक्के, 8 कारखान्यांनी 60-79 टक्के आणि 3 कारखान्यांनी 59 टक्क्यापेक्षा कमी थकबाकी भगावली. हंगामादरम्यान, 63 कारखान्यांना 82 रेवेन्यू रिकवरी कोड (आरआरसी) आदेश दिले गेले आहेत.

अलीकडेच, महाराष्ट्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मराठवाड्यातील 20 साखर कारखान्यांना आदेश दिला आहे की, ते ऊस उत्पादकांना 2014-15 च्या हंगामात वेळेवर पैसे न दिल्यामुळे 15 टक्के व्याजाने हे पैसे भागवावे लागतील. ऊस नियंत्रण आदेश 1966 नुसार 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची मान्यता असेल, तरच त्यांना नव्या गाळप हंगामासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांना गाळप परवाने देण्यात येणार आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here