महाराष्ट्र: अधिक मजुरी मिळावी या मागणीसाठी ऊस श्रमिकांचा संप

मुंबई: महाराष्ट्र मध्ये ऊस हंगाम एका आठवडयात सुरु होणार आहे. मोठ्या पावसामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत ऊस क्षेत्रात वाढीबरोबरच मोठया उत्पादनाची शक्यता आहे. सध्या ऊस तोड मजूर अधिक मजुरी मिळावी या मागणीसाठी संपावर आहेत.

गोपीनाथ मुंडे ऊस श्रमिक, वाहतुक आणि ठेकेदार संघ चे संयोजक आणि माजी आमदार केशव आन्धले यांनी सांगितले की, महाराष्ट्र मध्ये साखर कारखान्यांकडून अधिक पगाराच्या मागणीसाठी श्रमिक आणि त्यांच्या ठेकेदारांनी संप पुकारला आहे.

ऊस तोडणी मशीन ला प्रति टन 350-400 रूपयें दिले जातात, आणि त्याच कामासाठी ऊस तोडणी मजुरांना 239 रूपयें मिळतात. त्यांनी सांगितले की, ऊस मजुरांनाही मशीनप्रमाणेच मजुरी मिळावी. श्रमिक ठेकेदारही त्यांच्या कमीशनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. एका मजुराकडून अर्जित 100 पैकी, ठेकेदार ला त्याचे 18.5 टक्के कमिशन मिळते. ठेकेदार आता कमीशनमध्ये 10 टक्के वाढ करण्याची मागणी करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here