महाराष्ट्र : सोलापूर विभागात सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांत गाळप

महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. या हंगामात खासगी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. येथे १५ जानेवारी २०२२ अखेर १४१.४७ लाख टन उसाचे गाळप करून १२६.५५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १५ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ५९४.०६ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५८८.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १४२.२४ लाख टन उसाचे गाळप करून १६०.१२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.२६ टक्के आहे.

पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये १५ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १२१.०५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात १२२.२४ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.१० टक्के आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here