महाराष्ट्र: ऊस तोडणी मजुरांच्या संपामुळे गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

पुणे: महाराष्ट्रामध्ये ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण राज्यातील जवळपास 15 लाख ऊस मजूर, अधिक मजुरी मिळावी या मागणीसाठी संपावर आहेत. मजूरांची मागणी आहे की, याबाबत एनसीपी नेते शरद पवार यांनी हस्तक्षेप करावा. ऊस तोडणी मजूर आपल्या मजुरीमध्ये मशीन प्रमाणे 400 रुपये प्रति टनाच्या वाढीची मागणी करत आहेत. मजुरांनी दावा केला की, कोरोनामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला प्रभावित केले आहे.

ऊस कटर आणि ट्रान्सपोर्ट वर्कर्स यूनियन चे अध्यक्ष डीएल कराड यांनी सांगितले की, हंगाम सुरु होण्यापूर्वी श्रमिकांच्या मजुरीमध्ये वाढ केली जावी, कारण कोरोना महामारीचा मजुरांवर खूपच मोठा परिणाम झाला आहे. सध्या, श्रमिकांना प्रति टन 239 रुपये मजुरी मिळते, पण त्यांनी मजुरी वाढवून 400 रुपये प्रति टन करण्याची मागणी केली आहे. मजूर ठेकेदार ही कमीशन मध्ये 18.5 टक्के ते 30 टक्के पर्यंत वाढीची मागणी करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here