महिंद्रा देखील आर्थिक मंदीच्या कचाट्यात, १७ दिवस प्लांट बंद ठेवणार

महिंद्रा ने गेल्या महिन्यातच अर्थिक मंदीमुळे प्रॉडक्शन बंद करण्याची घोषणा केली होती. देशातील ऑटोमोबाइल बाजार मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. अलीकडेच देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारूती सुजुकी ने सप्टेंबर महिन्यामध्ये दोन दिवसांसाठी गुरु ग्राम आणि मानेसर येथे असणाऱ्या आपल्या प्लांटमधील प्रॉडक्शन थांबवण्याची घोषणा केली होती. आता प्रमुख वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा ने १७ दिवस प्लांट बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने हा निर्णय मागणी आणि प्रॉडक्शन दरम्यानच्या अंतराचा ताळमेळ घालण्सायाठी घेतला आहे. कंपनीने यापूर्वी ऑगस्ट महिन्यात म्हंटले होते की, जुलै -सप्टेंबर या तिमाहीत ८ ते १४ दिवसांंसाठी कुठलेच उत्पादन करणार नाही. कंपनीने अतिरिक्त ३ दिवसांसाठी प्लांटमध्ये उत्पादन न करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीच्या प्रबंधन च्या मतानुसार, यामुळे बाजारातील वाहनांच्या स्टॉकवर कोणताही परिणाम होणार नाही. बाजारातील सुस्ती आणि मंदी पाहूनच हे करण्यात आले आहे. कितीतरी दिग्गज वाहन निर्माता कंपन्या या मंदीमध्ये आपल्या प्लांट मधील प्रॉडक्शन बंद करण्यासाठी मजबूर होत आहेत.

नवी महिंद्रा XUV300 सब कॉम्पेक्ट सेगमेंट मध्ये एक नवा प्लेयर आहे. हा एसयूवी आपल्या सेगमेंट मध्ये सर्वात चांगल्या सुरक्षीत फीचर्स प्रदान करतो. या आठवड्याच्या सुरुवातीला, हिंदुजा समुहाची प्रमुख फर्म अशोक लेलैंड ने कमी मागणीमुळे आपल्या वेगवेगळ्या प्लांटमध्ये १६ दिवसांसाठी नो प्रॉडक्शन डे चो घोषणा केली होती. देशाच्या प्रमुख वाहन कंपन्या या आर्थिक मंदीला सरकारच्या करपध्दतीला जबाबदार धरत आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर GST दर २८ टक्के आहे, कंपन्यांच्या मतानुसार GST दराचे प्रमाण १८ टक्के केल्यास बाजारात पुन्हा चैतन्य येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here