मन्सूरपूर साखर कारखाना दीर्घकाळ सुरू राहणार

मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २० मे रोजी समाप्त होईल. यामध्ये मन्सूरपूर साखर कारखाना सर्वात शेटवपर्यंत सुरू राहाणार आहे. उर्वरीत कारखान्यांनी हंगाम समाप्तीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तीन कारखाने बंद झाले आहेत. उर्वरीत कारखान्यांपैकी तितावी कारखाना १० मे, खतौली कारखाना १२ मे, रोहाना कारखाना १५ मे आणि मन्सूरपूर कारखाना २० मे रोजी बंद होणार आहे.

जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी यांनी सांगितले की, जिल्ह्यात यंदाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. ज्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे, त्यांनी हंगाम बंद केला आहे. भैसाना आणि खाईखेडी कारखाने ३० एप्रिल रोजी बंद झाले. टिकौला कारखान्याचा हंगाम ४ मे रोजी संपला. इतर कारखान्यांनीही आपल्या तारखा जाहीर केल्या आहेत.

तितावी कारखाना १० मे रोजी सत्र समाप्त करेल. तर खतौली कारखाना १३ मे रोजी हंगाम संपवणार आहे. रोहाना आणि मोरना कारखाने १५ मे रोजी बंद होतील. मन्सूरपूर कारखाना सर्वात शेवटी असेल. त्याचे सत्र २० मे रोजी संपेल. गेल्यावर्षी हा कारखाना राज्यात सर्वात शेवटी बंद झाला होता. ऊस जादा असल्याने आताही २० मेपर्यंत गाळप होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here