महाराष्ट्रात या हंगामात अनेक कारखाने ऊस गाळप करु शकणार नाहीत

पुणे : महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो एकर ऊस पीकाचे नुकसान झाले आहे. तसेच मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात चार्‍यातील कमीमुळे जनावरांसाठी चारा म्हणून ऊसाची विक्री करण्यात आली. यामुळे साखर उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. साखर उद्योगातील अनुमानानुसार, 2019-2020 च्या हंगामात 65 लाख टन साखर उत्पादन होण्याची आशा आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे ऊस पीक पुराच्या पाण्यात होते, ते खराब झाले आहे. राज्यात साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात, उत्पादन अधिक कमी होण्याची संभावना आहे, ज्यामुळे साखर हंगामात कारखान्याला गाळपासाठी खूपच कमी ऊस उपलब्ध होईल. सांगली आणि कोल्हापूर बरोबरच मराठवाडा मध्ये साखर कारखान्यांना गाळपात अडचणीही येवू शकतात. दुष्काळामुळे, मराठावाड्यात अनेक कारखान्यांमध्ये गाळप हंगाम पूर्ण होण्याची संभावना नाही. 2018-19 हंगामाच्या तुलनेत, यावेळी 195 कारखान्यांपैकी केवळ 165 कारखानेच ऊस गाळपात भाग घेतील.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here