204.85 लाख क्विंटल उस गाळप झाल्यानंतर बंद झाला मवाना साखर कारखाना

मेरठ येथील मवाना साखर कारखान्याचा गाळप हंगाम मंगळवारी समाप्त करण्यात आला. साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, 26 मे च्या सकाळी शेतकर्‍यांचा गाळप योग्य उस घेतल्यानंतर कारखाना बंद झाला.

या हंगामात कारखान्याने 204.85 लाख क्विंटल उसाचे गाळप करुन जवळपास 23.80 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षाच्या अपेक्षेपेक्षा यावेळी कारखान्याने 25 लाख क्विंटल उसाचे अधिक गाळप करण्यात आले. कारखाना बंद झाल्यावर शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

त्यांनी सांगितले की, उसाचे पैसे लवकरात लवकर भागवले जातील. उस विकास विभागाकडून सर्वेक्षण कार्य सुरु झाले आहे. सर्व शेतकर्‍यांनी आपल्या शेतांमध्ये व्यक्तीश: उपस्थित राहून उसाचे योग्य पद्धतीने सर्वेक्षण करुन घ्यावे. जेणेकरुन येणार्‍या गाळप हंगामात कोणतीही समस्या येवू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here