महाराष्ट्रातील कोल्हापूर विभागात सर्वाधिक साखर उत्पादन

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. या हंगामात जादा साखर कारखाने गाळप करीत आहेत.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७४८.८५ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७५५.१६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.०८ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोल्हापूरमध्ये १७७.७२ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर २०४.२८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वात जास्त साखर उतारा कोल्हापूर विभागाचाच आहे. येथे साखर उतारा ११.४९ टक्के झाला आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापुर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १७७.७६ लाख टन उसाचे गाळप करून १६१.५१ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here