महाराष्ट्रात ५२ कारखान्यांकडून गाळप बंद

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत १८ मार्च २०२१ पर्यंत ५२ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला. राज्यात ९२०.२३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ९५७.५७ लाख क्विंटल उसाचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४१ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सोलापूर विभागात ३१ साखर कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागात ९ कारखाने बंद झाले आहेत. तर अहमदनगर विभागात ३ कारखाने बंद करण्यात आले आहेत. औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती विभागात प्रत्येकी २ कारखाने बंद झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here