साखर कारखाना सुरू झाल्यास लाखो शेतकऱ्यांना फायदा : यतीश्वरानंद

सितारगंज : ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी बंद पडलेल्या साखर कारखान्याची पाहणी केली. यावर्षी कारखान्याचा गाळप हंगाम पीपीपी तत्त्वावर सुरू केला जाणार आहे. कारखाना सुरू झाल्यास त्याचा फायदा सितारगंज, नानकमत्ता आणि खटिमा परिसरातील शेतकऱ्यांना होईल.

गुरुवारी ऊस मंत्री यतीश्वरानंद आणि खासदार अजय भट्ट यांनी सितारगंजचे आमदार सौरभ बहुगुणा आणि खटिमाचे आमदार पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत साखर कारखान्याची पाहणी केली. ऊस मंत्र्यांनी सांगितले की ३० जूनपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि एक जुलै रोजी तांत्रिक आणि आर्थिक निविदा उघडल्या जातील. जी कंपनी अधिक दर देईल, त्यांना कारखाना चालविण्यास दिला जाईल. त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल खासदार अजय भट्ट, आमदार सौरभ बहुगुणा आणि आमदार पुष्कर सिंह धामी यांचे आभार मानले. यावेळी शेतकरी आयोगाचे उपाध्यक्ष राजपाल सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष इक्बाल सिंह गुरजीत सिंह, कमल जिंदाल, आदेश ठाकूर, विकास शर्मा, उपकार सिंह बल, विजय सलूजा आदी उपस्थित होते.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, सितारगंज कारखाना बंद झाल्यानंतर व्हीआरएस न घेतलेल्या आणि समायोजनाची मागणी करत कोर्टात धाव घेतलेल्या ४५ कर्मचाऱ्यांशी चर्चा केली जाईल. लवकरच ऊस बिले देण्याबाबत निर्देश दिले जातील असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here