जसपूर : विजेच्या तारांमधील घर्षणामुळे पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी याबाबत तहसील प्रशासनाला माहिती दिली आहे.
भगवंतपूर गावातील विजेंद्र, विशाल, जितेंद्र, नेमप्रकाश, मानसिंह यांच्या शेतातील विजेच्या खांबावरील तारा हवेच्या जोरदार झोतामुळे एकमेकांवर आदळल्या. या घर्षणातून निघालेल्या ठिणग्यांमुळे शेतातील ऊसाने पेट घेतला. आसपासच्या लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत पाच एकर ऊस जळाला. आगीची माहिती समजताच महसूल विभागाचे निरीक्षक संजयकुमार यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली. रजिस्टार हेमराज सिंह यांनी अहवाल तयार करून शासनाला पाठवला जाईल असे सांगितले. दरम्यान, आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.