माय शुगर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे मंत्र्यांचे आश्वासन

बेंगळुरू : म्हैसूर शुगर कंपनी लिमिटेड मिलचे (माय शुगर फॅक्टरी) पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील असे आश्वासन साखर विभागाचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी विधानसभेला दिले. जनता दल सेक्यूलरचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामया यांनी ऐतिहासिक म्हैसूर शुगर मिलचे खासगीकरण न करण्याची मागणी यावेळी केली.

मंत्री पाटील मुनेनकोप्पा म्हणाले, आम्ही आधीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेवर चर्चा केली आहे. मी याबाबत दोनवेळा केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली आहे. मंड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. डिस्टिलरी, सहवीज प्रकल्प सुविधा, बॉयलिंग युनिट असूनही कारखान्याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सरकारने साखर कारखाना खासगीकरणाचा आपला प्रयत्न सुरू ठेवला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी यापूर्वी इशारा दिला आहे. मंड्या जिल्ह्यातील लोकांचे कारखान्याशी भावनात्मक नाते आहे असे ते म्हणाले. कारखान्याच्या सह उत्पादन सुविधांमध्ये सुधारणा आणि कारखान्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी मदतीबरोबरच आधुनिक डिस्टिलरी स्थापन करण्यासाठी कारखान्याला मदत करावी असे सिद्धरामय्या यांनी सुचविले.

जेडीएसचे सदस्य अन्नादानी यांनी सांगितले की, कारखान्याकडे जवळपास २००० कोटी रुपयांची २३५ एकर जमीन आहे. त्याचे खासगीकरण केले जाऊ नये. हा कारखाना मंड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here