हरियाणातील साखर कारखान्यात घोटाळे : आम. बलराज कुंडू यांचा आरोप

रोहतक : मेहम चे अपक्ष आम. बलराज कुंडू यांनी शुक्रवारी हरियाणा राज्यातील साखर कारखान्यांमध्ये 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अनियमीततेचा आरोप लावला. त्यांनी रोहतक मध्ये विकास कार्यांच्या वाटप घोटाळ्यांचाही आरोप लावला आणि राज्यातील माजीमंत्री मनीष ग्रोवर यांच्या विरोधात तपासणीची मागणी केली.

कुंडू म्हणाले की, माजीमंत्री मनीष ग्रोंवर यांनी हरियाणाच्या सरकारमध्ये सहकार मंत्र्याच्या रुपात आपल्या कार्यकालाच्या दरम्यान हरियाणामध्ये साखर कारखान्यांना घाट्यात दाखवून राज्याच्या खजिन्याचे मोठे नुकसान झाले होते. मनीष ग्रोवर आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य गेल्या काही वर्षांपासून साखर कारखान्यांमध्ये मोलॅसिस कारभार सुरु आहे. त्यांनी कमी दरात कारखान्यातून मोलॅसिस खरेदी केले आणि त्याला मोठ्या किमतीत विकले, ज्यामुळे राज्याच्या खजिन्याचे मोठे नुकसान झाले. त्यांनी ग्रोवर च्या जवळपास काही ठेकेदारांना काम देणे आणि रोहतक मध्ये विकास कामांचे वाटपासंदर्भात अनियमतितेचा आरोपही लावला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here