ऊस थकबाकी बाबत आमदारांनी घेतली ऊस आयुक्तांची भेट

गढमुक्तेश्‍वर : ऊस थकबाकी न भागवल्याने क्षेत्राचे आमदार डॉ. कमल मलिक यांनी ऊस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांची भेट घेतली. त्यांनी लवकरात लवकर शेतकर्‍यांचे पैसे देण्याची मागणी केली. याबराबेरच सांगितले की, जर साखर कारखाने पैसे देत नसतील तर कारखान्याचा लिलाव करावा.
शेतकर्‍यांचे ऊस मूल्य न मिळाल्याच्या दिशेने आगामी गाळप हंगामा दरम्यान सिम्भावली साखर कारखान्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या ऊसाचे पैसे देण्यासाठी क्षेत्रीय भाजप आमदार कमल सिंह मलिक यांनी ऊस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी ऊसाचे पैसे लवकरात लवकर भागवण्यास सांगितले. आमदारांनी सांगितले की, जर ऊसाची थकबाकी देण्यात याप्रकारे विलंब होत असेल तर सिम्भावली साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्रामध्ये यावेळी कपात केली जावी, कारण गेल्या गाळप हंगामादरम्यान 29.80 लाख क्विंटल ऊसाचा पुरवठा कमी करुन नऊ खरेदी केंद्रांना सिम्भावली साखर कारखान्यापासून हटवून चंदनपूर साखर कारखान्यामध्ये मर्ज करण्यात आले होते. ज्यामुळे सिम्भावली साखर कारखान्याचा गाळप हंगाम दुसर्‍या कारखान्यांच्या तुलनेत जवळपास एक महिन्याआधी संपला होता.

आमदारांनी सांगितले की, ऊस थकबाकी बाबत त्यांनी अनेकदा लखनौ मध्ये केन कमिश्‍नर यांची भेट घेतली. ज्यामध्ये मुख्यपणे हा मुद्दा घेण्यात आला आहे की, आपल्याच ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. आमदार म्हणाले की, ऊस थकबाकी न भागवल्याने सध्याच्या वर्षाच्या सुरुवातीमध्ये शासनस्तरावरुन साखर कारखान्याविरोधात 196 करोड ची रिकवरी जारी करण्यात आली होती, परंतु कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन लागू झाल्यामुळे वेळ संपण्यापूर्वी ही रिकवरी निष्प्रभावी झाली होती. आमदारानी दावा केला की, शेतकर्‍यांच्या हितार्थ हरप्रकारे पावले उचलण्याबरोबरच पुन्हा रिकवरी जाहीर करुन साखर कारखान्याचा लिलाव केला जाईल, ज्याचे पैसे शेतकर्‍यांना ऊस थकबाकी म्हणून दिले जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here