साखर कारखान्यामध्ये शेतकर्‍यांसह आमदारही आंदोलनात सहभागी

लखीमपूर, उत्तर प्रदेश: आमदार अरविंद गिरी यांनी रविवारी शेतकर्‍यांच्या बरोबर कुंभी साखर कारखान्यामध्ये धरणे आंदोलनात सहभाग घेतला. आमदारांसह शेतकर्‍यांनी मागणी केली की, लवकरात लवकर ऊस थकबाकी भागवावी आणि साखर कारखान्यामध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळावा. आमदारांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतल्याने कारखाना प्रशासनात गोंधळ माजला आणि कारखान्याच्या अधिकार्‍यांनी देखील परिस्थिती पाहून धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार अरविंद गिरी यानीं एक निवेदन कारखान्याचे महाव्यवस्थापक (वाणिज्य) मुकेश मिश्रा, महाव्यवस्थापक ऊस आरएस ढाका यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, कारखान्यामध्ये 50 ते 60 टक्क्यापर्यंत अधिकारी, कर्मचारी आणि मजूर हे स्थानिक असावेत. योग्यतेनुसार अधिकारी, कर्मचार्‍यांची मुले आणि भागातील प्रतिभावंताना प्राधान्य देऊन ,साखर कारखान्यामध्ये विविध पदांवर रोजगारांच्या संधी दिल्या जाव्यात. ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यावर ऊस थकबाकी चौदा दिवसांच्यात आत भागवली जावी. दरम्यान अमीरनगर येथील अध्यक्ष ठाकुर अरविंद सिंह, माजी ग्रामप्रमुख पप्पू खान, जवाहर लाल वर्मा, रामभरोसे सह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here